Monday, October 4, 2010

"Space "

" Come on please इ need some space in my life " हे वाक्य आपण कितीतरी वेळा बोलतो बरेचजण मनात बोलतात तर काहीजण समोर बोलतात आणि काही जण follow करतात किंवा करायचा प्रयत्न तरी करतात. आज एकत्र कुटुंब पद्धतीत राहणारे सर्वजण एकमेकांना प्रत्येकाची माहिती असलीच पाहिजे बारीक हाल्चालीसुद्धा माहित असल्याच पाहिजे असा अट्टाहास ठेवणारे आणि कधीकधी ,बरेचवेळा काळजीपोटी माहित असल्या पाहिजे असा मानतात.पती-पत्नी त्यांना तर एकमेकांची ओळख betterhalf म्हणूनच असते.पण बऱ्याचवेळा असा विचार केला तर मला असा वाटत ह्यापैकी प्रत्येकानं खूप वेळा आपली स्वतःची space हवी असते ,म्हणजे आपला एखादा स्वतंत्र आयुष्य ,स्वतंत्र विचार असावा जो ह्यापैकी कोणालाही माहित नसावा ते इतका personnel असावा कि त्याबाबत you should answerable only yourself आज घरात राहणाऱ्या स्त्रीला,म्हाताऱ्या माणसाला,अपंग व्यक्तीला नोकरी करणाऱ्या कोणालाही कितीतरी वेळा असे विचार येत असतीलच ना कि माझ्या आयुष्यात मला येणाऱ्या अनेक विचारांबाबत मी कोणाशीही चर्चा करू नये मी असा काहीही आणि तसाच स्वतःला समाधानकारक स्वतःला आवडणारं माझ्यामुळे एखाद्याला नकळत आनंद देणारं असा काहीही स्वच्छेने करावा आणि तेही असा विचार करून कि " It's my life & I need some space for that and I should not answerable to anyone " Is that possible?
मी म्हणेन हो शक्य आहे.मी हा विचार येथे मुद्धाम मांडायचा प्रयत्न करतेय त्या लोकांसाठी ज्यांना खरच असा वाटत असता कि आपण आपल्यासाठी वा आपल्याला येणारे विचार वा आपण स्वतःला समाधानकारक जे काही करतोय ते योग्य करतोय पण ह्याबद्दल मला कोणाला सांगायची इच्छा पण नाहीये मी त्यांची बाजू मांडायचा प्रयत्न करतेय.आणि असे विचार करणारे खूप जण मी माझ्या आजूबाजूला बघितले आहेत.आई-वडिलांनी त्यांचे निर्णय मुलांवर थोपवायचे or मुलांनी त्यांचे विचार आई-वडिलांवर सांगायचे मित्र मैत्रीणीत ,पती-पत्नी ह्या सगळ्यांमध्ये एकमेकांना देणारी space हि वेगळी असते आणि स्वःताने स्वतःसाठीच निवडलेली space हि वेगळी असते.
तुम्हीही एकदा प्रयत्न करून बघा खरच तुम्हाल तुमची "space " निवडता येतेय का ते ?

Friday, July 30, 2010

मैत्री...

"लक्षात ठेव दोस्ता,तुला मी हवा आहे म्हणूनच मला तू हवा आहेस " वपुर्झा मधलं वाक्य आहे.आयुष्यात प्रत्येक नात गरज म्हणून नसत पण मैत्रीची गरज कायम असते ,ज्यात सगळी नाती तुम्हाला अनुभवायला मिळतात.छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडणं ,रुसवे फुगवे,थट्टा-मस्करी ,आणि न सुटणाऱ्या गुंतागुंतीच पण प्रेमळ नातं असतं.पण त्यात गरजेपुरती असणारी मैत्री नको.
बरेच जण असा म्हणतात कि "A Friend in need a Friend indeed " पण मला असा वाटत त्यानंतर ती गरज टिकवून ठेवणं ती मैत्री.बर्याच जणांच्या आयुष्यात असे क्षण येतात कि त्याला खरच एका आधाराची गरज असते त्यावेळी आधार बनणं ती मैत्री आणि तोच आधार सतत गरज बनत जाण तीपण मैत्रीच.
सगळ्याच गर्दीला आपलंसं करता येत नाही आणि सगळ्या गर्दीत आपण सामील होऊ शकत नाही काहीजण असा करूही शकतात पण ते स्वतःचा स्वार्थ म्हणून करतात.ते कधीच मैत्री जाणू शकत नाहीत.आपला मार्ग आपण निवडायचा आहे.मैत्रीत आलेले क्षण कसे टिपून ठेवायचे ,कसे जपायचे,आणि कसे टिकून ठेवायचे, गरज असताना आधार देण कि आधाराची गरज असताना ती शोधण का आधाराची गरज असताना जी सोबत मिळाली आहे ती कायम जपून ठेवणं.

Happy Friendship Day

Sunday, July 18, 2010

माझे श्रद्धास्थान......

सकाळी ट्रेनमध्ये ऐकलं अगं आज अंगारखी चतुर्थी नाही का? म्हणून titwalyala जाऊन आले दर चतुर्थीला जाते ना मी, हे ऐकून वाटलं अरे लोकांची किती श्रद्धा आहे?दर वेळी न चुकता हि बाई जाते वा छान,पण नंतरच तिचा वाक्य ऐकून माझा लगेच लोक किती बाउ करतात ह्या गोष्टींवरचा विश्वास ह्या बाईने कायम ठेवला,ती म्हणाली सकाळी titwalyala जायचा घाईत "मी सकाळी देवाला नमस्कार करायचा विसरूनच गेले" लोकांना घरातल्या देवासमोर ५ मिनिट उभे राहून नमस्कार करायला वेळ नाही मग हे मंदिरात जाऊन स्वतः किती श्रद्धाळू आहेत असा का दाखवतात किंवा हे असं करून देव पाऊ शकतो? मला तर असं वाटत कि लोक मानसिक समाधानापेक्षा नवस बोलण्यासाठी वा काही ना काही मागण्यासाठी देवस्थानांना भेटी देतात.लोक ह्या ना त्या जोतीष्यांकडे जाऊन त्यांनी सांगितलेले उपाय म्हणून आणि बरेच वेळा स्वतःसाठी काही ना काही मागण्यासाठी मंदिरात जातात पण काही काही लोक मानसिक समाधानासाठी अशा श्रद्धास्थानी जाऊन येतात पण आजकाल ह्या तीर्थस्थानी लोकांच्या श्रद्धेचा बाजार मांडला जातो हे कितपत योग्य आहे?लालबागचा राजा असो,शिर्डी असो,तिरुपती असो,मुंबईचा सिद्धिविनायक असो लोकांना १०-१२ तास खिळवत ठेवलं जातं ५ मिनटांच्या दर्शनासाठी,VIP line ,मुखदर्शन,आणि फक्त पाया पडण्यासाठी आलेले लोक ह्या सगळ्यांच्या वेगवेगळ्या आणि लांबलचक रांगा लागलेल्या असतात .हे सगळं कशासाठी?कोणासाठी? देवाला भेटण्यासाठी का स्वतःच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी? का हि संस्थान चालवण्यासाठी? का स्वतःच्या मानसिक समाधानासाठी?

आज तुम्ही तुमच्या देवघरात एकदा निरखून बघा हि एवढी संस्थान आहेत तेवढे सगळे देव तुमच्या समोर असताना तुम्ही तुमची वाट अशी का बदलता? मला असं म्हणायचा नाहीये कि देवळात जाऊन तरी काय होता ?तुमच्या इच्छेने तुम्ही देव माना,मनापासून माना,आज ह्या गुरुजींनी सांगितला म्हणून आज ह्या देवळात जातेय /जातोय ,हे अस सांगितल्यावर यश तुमच्या पदरात पडेल ?तुमच्या देवघरात जो गणपती आहे तोच सिद्धिविनायकला आहे,तोच गणपतीपुळ्याला आहे आणि तोच लालबागचा राजा आहे,फक्त तुमचा श्रद्धास्थान तुम्ही निवडायचा आहे
मला इथे आस्तिक-नास्तिक हा मुद्दा अजिबात उभा करायचा नाहीये. मला इथे ह्या श्रद्धास्थानानी मांडलेल्या लोकांच्या श्रद्धेच्या बाजाराची चीड आहे.
देव कधी सांगत नाही मला हे हव आहे ते हवा आहे ,पण आपापल्या परीने आणि आपापल्या मनापासून असलेल्या श्रद्धेने जे काही लोक देवासाठी करतात त्याच्या बाजार मांडला जाऊन नये एवढंच माझं म्हणणं आहे .ह्यानंतर तुम्ही तुमचं श्रद्धास्थान निवडायचा आहे.

Saturday, July 17, 2010

दिवस असे कि......

college सोडून साधारण १-२ वर्ष तरी सगळेजण college च्या आठवणीमध्ये जगत असतात,काहीजण पुढे शिकत असतात ,तर काहीजण कुठेतरी job शोधून join होतात ,तिथे नवीन relations तयार होतात,त्यांना अगदी कंटाळा येईपर्यंत वा पाठ होईपर्यंत आपण college चे किस्से सांगून सांगून कंटाळा आणतो.पण college नंतर होणारे relations हे एक वेगळाच अनुभव देऊन जातात,मुंबईमध्ये सकाळी तासभरपण घरात जात नाही,नेहमीची train पकडायची घाई असते त्याच मूळ कारण traincha group,तास-दीडतास त्यांच्याबरोबर काय आपला आयुष्य आहे धावपळीचा हे रोज बोलण्यात जातो,पण असाच आयुष्य हवं असा मनात बोलतो,ऑफिसमध्ये कोण कोणाच्या ओळखीचा नसून नंतर एकत्र ऑफिसला जाण,एकत्र डबा खाणं हे सुरुवातीचा आयुष्य असता ,पण ह्याच आयुष्यात काही जणांचे इतके ऋणानुबंध चांगले होऊन जातात,घरच्यांच्या वाटयला आपण कमी असतो पण हे सगळे जण आपल्यासोबत दिवसभर असतात ,आज हे असा झालं आज तसं झालं ऑफिसमधल्या चांगल्या वाईट ह्या अनुभवापासून ते कधी कधी वैयक्तिक आयुष्यात होणार्या आयुष्याच्या आढावा एकमेकांशी नकळत आपण बोलायला लागतो ,एकाचा problem हा आपल्या सगळ्यांचा आहे असंच समजून इतके एकमेकांच्या आयुष्यात ओढले जातो कि कळतच नाही आणि एक दिवस अचानक आपण असलेल्या job च्या frustrationmule दुसरा job पत्करतो ,आहे तो job सोडण्याच्या आनंदात असतो,new job, new envoiurnment ,new people आणि more salary ह्या आनंदात असताना change होणारी ट्रेनचे सोबती आणि change होणारे collegues हे तेव्हा नुसते सोबती तेव्हा राहिलेले नसतात ................आता हे मी कोणाला सांगू?

Thursday, June 24, 2010

गोरखगडच्या वाटेवर...

२० जून सकाळच्या ६.३० ची बस पकडायची ह्या हिशोबाने उठून तयारी केली, आज आमचा दौरा होता "गोरखागडला" चा..सकाळी नेहमीप्रमाणे पावसाच वातावरण होतं, पण पडत नव्हता पण सकाळी थंड वातावरण होता थोडं.आम्ही १६ जण होतो.सकाळी सकळी दिसणारी हिरवळ खूपच छान दिसते,थंड लागणारी हवा मन प्रसन्न करून जातं. आम्ही मुरबाडला ७.४५ला पोहोचलो,तिथून आम्ही देहरी ह्या गावात जायला गाडी केली होती.२० मिन्ताच्या वाटेवरून जातानाच समोर मच्छिंद्रगड आणि गोरखगड दिसतो ,सकाळी पावसाचे ढग त्या गडांना भिडत होते ,त्या धुक्यात दिसणारे ते गड मला कॅमेरात बंदिस्त करण्याचा मोह आवरू शकले नाहीत . आम्ही २० मिनटात देहरी गावात पोहोचलो, सकळी मस्त गरम गरम भजी,वडापाव ह्यावर तव मारून आम्ही गड चढायला सुरुवात केली,पण जस जस गड चढायला सुरुवात केली थंड वातावरण कमी कमी होत घामाच्या धारा वाहायला सुरुवात झाली होती ,वार्याचा लवलेशही आम्हला तासभर जाणवत नव्हता .थोडाफार पाऊस पडून गेल्यामुळे वाढलेल्या झाडांच्या आणि गवताच्या वाटेवरून जाताना वाटत अपना घनदाट रानातून जात आहोत म्हणून... मुख्य दरवाज्यापाशी पोहोचल्यावर तिथे पाण्याच्या दोन-तीन टाक्या लागतात त्यांनतर थोड्याश्या पायर्या चढल्यावर आम्ही गोरखगडाच्या गुहेपाशी येऊन पोहोचलो .समोर हिरवळीने दाटलेला ढगांनी वेढलेला आणि समोरून भयाण दरी असा मधोमध मच्छिंद्रगड तुमचा सारं लक्ष वेधून घेतो .बराचवेळ मच्छिंद्रगडच्या सानिद्ध्यातही जाव असा तुम्हला क्षणभर वाटावं इतका तो सुंदर दिसतो. त्या नंतर आम्ही थोडी विश्रांती घेतली. गोरखगड हा त्याच्या माथ्यावर चाध्ल्याशिवाय पूर्ण होत नाही ,एक साधारण १० मिनिटाच्या पायर्या चढून आम्ही वर जात असताना थोडासा वळून मागे पहिले तर संपूर्ण हिरवळीने दाटलेली दरी बघितली आणि आणि वरती चढून गेलो .आणि तिथे तुम्हाला भिडणारा थंड वारा,समोरून निसर्गाच्या सान्निध्यात दिसणाऱ्या आणि ढगांच्या दाटीवाटीने वेढलेला नाणे घाट,सिद्धगड आणि मच्छिंद्रगड बघून तिथून पाय निघत नव्हते. त्याठिकाणी आम्हीपण "ग्लोबल वार्मिंग ची थोडीशी जण ठेऊन एक छोटासा रोपट आमच्या ट्रेकची आठवण म्हणून लावलं . त्यांनतर परत गुहेत आल्यावर मस्तपैकी जेऊन थोडी विश्रांती घेऊन आम्ही परतीच्या वाटेवर निघालो ..संध्याकाळी ५ ला आम्ही परत देहरी गावात पोहोचलो आणि परत मागे वळून बघितले आणि रोप किती वाढल्यावर इथे यायचा ह्या विचाराने पुन्हा गाडीत बसलो

Wednesday, June 16, 2010

"एक cutting "

" एक cutting दे रे मित्रा" मस्त पाऊस सुरु झाला आणि चहाच्या टपर्यांची गर्दी वाढली, रस्त्याच्या टोकाला उभे राहून ciggrate ओढत ओढत सगळेजण cutting मारतात,पाऊस फक्त बहाणा असतो म्हणा,पण लगेच collegeche दिवस आठवले थोडा जरी पाऊस सुरु झाला तरी भिजण्यासाठी अनेक निमित्त काढून मी आणि माझी मैत्रीण फिरायला निघायचो,संध्याकाळी मित्रं-मैत्रिणी सगळे भेटायचो आणि चहाच्या tapariver आमचा मोर्च्या असायचा आम्हा सगळ्यांचा ,सकाळी सकाळी कॉलेजजवळ चहाच्या अनेक cutting व्हायची ,आज ह्याच्याशी पैज ,आज ह्याच्याकडून cutting आहे रे सगळ्यांना असा म्हणायच्या आवकाश आणि सगळ्यांचा घोळका व्हायचा आजूबाजूला ,फुकटातली cutting घेण्यासाठी सगळे कायम तयार असायचे ,भर पावसात मस्त मक्याचा कणीस खायला पण सगळेजण १०-१५ रुपयेपण मोजून मोजून काढायला लागायचे ,contribution काढून कांदा भजी आणि मुग भजीच्या गाडीवर जायचो ,कधी कधी पावसात ice -creame खायला पण मजा यायची ..........
collegechi खूप आठवण येते अशा दिवसात आता कोणाला contribution काढायची गरज नाही पडत ,पण आजकाल सगळ्यांना भेटायला वेळ खूप खर्ची होतो आणि त्यासाठी contribution पण नाही काढता येत....
अजूनही वेळ गेलेली नाही मित्रांनो छान पावसात मित्रांना सगळ्या call करून जमा टपरीवर आणि एक cutting मारा ,आणि पूर्वीच्या आठवणी काढत काढत नवीन आठवणी तयार करा

Monday, May 10, 2010

nirnay

आज फार क़्वचित घर आहेत कि तिथे Joint family पद्धत आहे त्यात वडीलधार्या माणसांनी सांगितल्याप्रमाणे वा त्यांचा शब्द हा शेवटचा ही पद्धत आहे,खरा तर आजचे आई -वडील मुलांना त्यांचे निर्णय घेण्याची मुभा देतात पण हे आजच झाला,ह्या गोष्टी आधीच्या पिढीतल्या लोकांना पटत नाहीत,खर तर आपल्या आई -वडिलांच्या आधीची पिढी पण आज आपल्या मुलांप्रमाणे वा त्यांच्या नातवाच्या निर्णयाचे स्वागत करतात ...
आज आपली पिढी इतकी बिनधास्त आहे हे त्याच कारणामुळे,कारण आपले आई वडील आपल्याला आपले निर्णय घेऊ देतात,पण तरीही आधीच्या पिढीतल्या लोकांना हे अजूनही चुकीचा वाटत,आपला निर्णय हा शेवटचा हे असा तत्व धरून चालणारे कितीतरी जण आहेत...........आधीच्या लोकांना आलेले अनुभव त्यामुळे ते काळजीपोटी ते सांगत असतात ही त्यांच्याबाजूने बरोबर आहे,पण माणूस जोपर्यंत स्वताचे निर्णय घेत नाहीत तोपर्यंत त्याला अनुभव येणार नाही , आजची पिढी पण अनेक वेळा दुस्रांच्या निर्णयावर अवलंबून असते म्हणजे आई बाबाब्ना विचारून सांगतो/सांगन्ते ...............हे बरोबर आहे नाही असा नाही ,कारण आदरापोटी त्यांना निर्णय विचरण हे योग्यच आहे...............पण आपणही कधीतरी स्वतःहून काही काही निर्णय घ्यावे.............
आज कुठल्या वेळेला कोणी सोबत नसताना जर काही विचार करायची वेळ आली तर तो विचार करण्याची क्षमता तुमच्यात असली पाहिजे ,दुसर्यांच्या विचारानुसार चालण्यापेक्षा स्वत पडा,अडका पण त्यातून तुम्ही स्वत बाहेर पडा तुमच्या पद्धतीने.......

emotional v/s practical

tu emotional ahes ka practical?” ha prashna vicharlyaver tumhi nemka vicharat padalat ter tumhi emotional ahat.karan practical manus hya aslya gostincha vichar karat nahi asa pratekala watta…….

Emotional vyaktina watta ki practical lokana kuthlyahi gosticha vichar karat nahit,tyana emotions ha parkar nasato,ani te dusryacha vichar karat nahi…..asa nahi ki emotional lokach ha vicha karatat,spashtapane wagnare lok pan asach vichar kartat bhavanik lokansathi…….ki he hyancha ayusha fakt dusryancha or konachahi vichar karyat ghalvtat,kuthlyahi goshtit te khup bhavanik hotat……..ekmekanbaddal asach vichar karatat……….



Ek vel tyana asa vatel ki emotional lok kalanusar or anubhavanusar pan practical hotat pan practical lok kadhich bhavnik honar nahit or kuthlyahi bhavanechya adhere jaun swatacha swabhav change karnar nahit……………..



Actualy he mhanna chukich ahe ki swabhav change karat nahit.caz to pratek manasach ek swabhav ahe jo kadhih change honar nahi………………practical lok goshti accept kartat mhanun te emotional nanstat,te sudha bhavanechya ahari jatat kadhi kadhi………….but they accet the facts whtever its is(good or bad)……………



Hya goshtit mala ha vvad nahi ubha karaycha ahe ki bhavanik lok shreshtha ka practical lok……….?karan pratek jan apaplya jagi barober asto…………….

Kadhi kadhi je bhavanik nastata te kadhi kadhi prasangancha bhan n thevta bolatate teva bhavnik lok prasang japun hataltat……………pan kadhi kadhi prasang tase nastetnasuddha bhavnik lok ajun bhavnechya ahari jaun swatal tras karun ghetat……………



Aso……….ha waad kadhich sampanara nahiye……………



Tumcha mat kay ahe hyabaddal?

" मी " पणा,अहंकार आणि self respect

" मी " पणा,अहंकार आणि self respect ह्यात कितीसा फरक आहे असा तुम्हाला वाटतं,मला कधी कधी ह्याचं अर्थ एकाच वाटतो.आता तुम्ही म्हणाल कि कसा काय ?self respect म्हणजे स्वतच्या अस्थित्वाची,स्वताच्या मूल्यांसाठी चालणारी धडपड,प्रयत्न. म्हणजे काय शेवटी स्वतःचा विचार करूनच ना........मी पणा मध्ये फक्तस्वतःच्या मनाचा विचार केला जातो ,माझे विचार,माझी तत्व,माझ्या मर्यादा आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये इतरांनी पण तेच मान्य केले पाहिजेत असा अट्टाहास.आणि तोही by hook or crook मग त्या चुकीच्या असल्या तरी चालेल.
मी असा म्हणत नाही कि ह्या सगळ्या गोष्टी सारख्याच आहेत म्हणून ........नाहीच आहेत कारण self respect म्हणजे आपण करतोय त्या गोष्टी चुकीच्या नाहीयेत आणि त्या गोष्टींसाठी विरोधात जाणं. आता प्रश्न आहे अहंकाराचा तो मी पानाच्या फारच जवळ आहे..आपला कसाही असणारं अस्थित्व समोरच्याने कायम गणतीत घेतला पाहिजे ह्याचा चुकीचा हट्ट,आणि त्याच भ्रमात राहून आयुष्य जगणं. असा मला वाटतं
ह्या गोष्टी साधारण किती भिन्न आहेत हे मला कोड आहे ,तुमच्याकडे ह्याच उत्तर आहे ?

Wednesday, March 31, 2010

"चायला ते अय्या""चायला तुला एवढा साधा काळात नाही ? दिवसाची सुरुवात झाली कित्तेक जणांचा तोंडात हा शब्द बराच असतोच असतो,चायला हि काही शिवी झाली ? हे सुधा चायला बोलताच बोलतात,मुलांच्या तोंडात तर सर्रास असतातच असतात पण मुलींच्या पण तोंडात असतात शाळा कॉलेजला असल्यापासून मित्र मैत्रिणींमध्ये वापरला जाणारा मराठमोळा शब्द घरात चुकून आई वडिलांसमोर चायलाच्या ऐवजी "अय्या" येतो म्हणजे काळानुसार तो बदलत जातो कॉलेज मध्ये असताना तर हमखास तोंडात तो शब्द होता ,आज कित्तेक वेळा तो शब्द तोंडात कोणासमोर आला कि भाऊ अश्या नझरेने बघणार डोळे मोठे करणार आणि "चायला "चुकून तोंडात आला असा आपण म्हणणार ;) ह्या शब्दाभोवती गुंडाळणार आपलं आयुष्य बघता असताना जाणवतेय आता शाळेत असताना स्नेह संमेलन असताना एखादी नाचाची वा नाटकाची रंगीत तालीम करताना,कॉलेजमध्ये कट्ट्यावर बसताना चिडवताना आणि ज्याला त्रास देतोय तो चोडून बोलणारा त्याच्या तोंडातून हमखास हाच शब्द बाहेर पडतो.आत्ता आत्ता कधीकधी ह्या चायलाची जागा बर्याच वेळा अय्याने घेतली आहे असा क़्वचित वाटत,पण शेवटी चीर तरुणपणा म्हणा वा चिरंजीवी लाभलेला हा "चायला " तुमच्याही आयुष्यात तुम्ही कितीवेळा अनुभवलंय ह्याची गणतीच नसेल.